पूंछमध्ये ४२ तोफगोळे नष्ट   

श्रीनगर : भारत-पाकिस्तानमधील लष्करी संघर्षानंतर नागरी भाग सुरक्षित करण्याच्या उद्देशाने चालवलेल्या मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी रविवारी पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील विविध गावांमध्ये ४२ तोफगोळे नष्ट केले.  
 
भारतीय सैन्याने स्थानिक पोलिस अधिकार्‍यांच्या सहकार्याने झुल्लास, सालोत्री, धाराती आणि सलानी या सीमावर्ती भागात ४२ तोफगोळेे सुरक्षितपणे नष्ट करण्यासाठी नियंत्रित मोहीम यशस्वीरित्या पार पाडली. हे गोळे अलिकडेच सीमेपलीकडून झालेल्या गोळीबाराचे अवशेष आहेत. ही कारवाई अत्यंत अचूकतेने पार पाडण्यात आली आणि नागरिकांच्या जीविताला किंवा मालमत्तेला कोणताही धोका टाळण्यासाठी सर्व मानक सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले. भारतीय लष्कराच्या बॉम्ब निकामी पथकाने सर्व स्फोटके पूर्णपणे निकामी केली.

Related Articles